जळगाव जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या आदेशाने ग्रामसेविकेला एक महिन्यापर्यंत न्यायालयीन कोठडीचे आदेश

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे)

 जिल्हा परिषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांच्या तक्रारीवरून भुसावळ तालुक्यातील किन्ही येथील ग्रामपंचायतीचे दप्तर ताब्यात न देणाऱ्या ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर यांना जिल्हाधिकाऱ्यांनी एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.[ads id="ads2"]  

  मिळालेली अधिक माहिती अशी की, भुसावळ तालुक्यातील किन्ही येथून बदली होऊनही आपल्या ताब्यातील दप्तर नियुक्त ग्रामसेवकास हस्तांतरित न करणाऱ्या किन्ही येथील तत्कालीन ग्रामसेविका प्रियंका अशोक बाविस्कर कठोर कारवाई करत एक महिना न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिल्याने जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिले.[ads id="ads1"]  

  यावल तालुक्यातील चुंचाळे येथील तत्कालीन ग्रामसेविका बाविस्कर यांनी बदली होऊनही त्यांच्या कार्यकाळातील ग्रामनिधी, पाणीपुरवठा स्वच्छ भारत मिशन, रोजगार हमी, १४वा वित्त आयोग, दलित वस्ती योजनेची कीर्द, कोणतेही दप्तर देण्याचे बाविस्कर यांनी टाळले होते. प्रियंका बाविस्कर यांना वारंवार सूचना देऊनही दप्तर न दिल्याने याबाबत जिल्हा परिषद सदस्या पल्लवी प्रमोद सावकारे यांनी पाठपुरावा केला होता. 

  यावर जिल्हाधिकारी यांच्याकडे दोन महिन्यापूर्वी सुनावणी झाली होती. यात १० दिवसांच्या आत दप्तर ताब्यात देण्याचा लेखी आदेश जिल्हाधिकारी राऊत यांनी ४ नोव्हेंबरला दिले होता. तरी दप्तर न दिल्याने ग्रामसेवकांच्या तक्रारीवरून कारवाई करण्यात आली. या ग्रामसेविकेला दप्तर परत देईपर्यंत किमान ३० दिवस न्यायालयीन कोठडीत टाकण्याचे आदेश दिले आहे. यासंबंधीचे पत्र यावल पोलिस निरीक्षकासह जिल्हा तुरुंग अधीक्षकांना दिले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!