प्रहार जनशक्ती पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी केली पातोंडी, पुनखेडा येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी ; पंचनामा करण्याची केली मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 

रावेर प्रतिनिधी (विनोद कोळी) रावेर तालुक्यातील पातोंडी, पुनखेडा येथे गारपीट व वारा वादळामुळे केळी नुकसानग्रस्त बांधावर आज दिनांक १२जून रोजी  पोहचून पाहणी करून अनिल चौधरी यांनी शेतकऱ्यांना दिलासा व धीर देण्याचा प्रयत्न केला.[ads id="ads1"] 

या वेळी त्यांनी राज्यमंत्री ना.बच्चूभाऊ कडू यांच्याशी दूरध्वनी माध्यमातून शेतकऱ्यांशी बोलणे करून दिले ना.बच्चूभाऊ कडूनी लवकरच पंचनामा व्हावा यासाठी अधिकारी यांना तसे आदेश दिले. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत व्हावी यासाठी राज्य सरकार कडे ते मागणी करणार आहे. [ads id="ads2"] 

  तसेच सर्व अधिकाऱ्यानी तात्काळ पंचनामे करावे व योग्य ती मदत करावी. असे सुद्धा आवाहन केले. अशा संकटाच्या काळात शेतकऱ्यांना दिलासा व मदत मिळणे अपेक्षित आहे. सध्या शेतकरी हवालदिल झाला असून लवकरात लवकर पंचनामे करून नुकसानभरपाई मिळावी, अशी नम्र विनंती त्यांनी अधिकाऱ्यांना केली.

या वेळी प्रहार जिल्हाध्यक्ष राजेंद्र महाजन, शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष सुरेश चिंधू पाटील, युवक जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष गणेश बोरसे, प्रदीप महाजन, रावेर उपतालुकाध्यक्ष शुभम पाटील, नारायण धनगर, भगवान बोरसे, विलास बोरसे, जगन्नाथ बोरसे, समाधान पाचपोळे, लक्ष्मण सावळे, स्वप्नील सावळे, अशोक पाटील, हरीश पाटील, डॉ.गुलाब पाटील, विनोद पाटील, हिंमतराव पाटील, विजय पाटील, बिजलाल लवंगे, पंकज सपकाळे व सर्व शेतकरी उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!