या शेतकऱ्यांनाच मिळणार 50 हजार रुपये अनुदानाचा लाभ

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. राज्य शासनाने नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतलेला आहे व त्याबाबतचा शासन निर्णय सुद्धा निर्गमित करण्यात आलेला आहे. यामध्ये काही निकष, पात्रता लावण्यात आलेल्या आहेत, तरी यामध्ये आपण पात्र आहात ? की अपात्र हे जाणून घेऊया. योजनेची अंमलबजावणी ही ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. [ads id="ads1"] 

कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल. शासन निर्णय क्रमांकः प्रोअयो ०६२२ / प्र.क्र.७२/२-स या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.[ads id="ads2"] 

50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण 

सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असतील. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेच्या लाभास पात्र असतील.

  सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत 

 १) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी. २) महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/ राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा / राज्यसभा सदस्य, आजी/

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!