रावेर (सुवर्ण दिप वृत्तसेवा)
दि.२९ एप्रिल २०२३ रोजी सन २०२३ मध्ये झालेली ए.आय.बी.ई.परिक्षेचा निकाल आलेला असून सदर परिक्षा एड. राजेश वसंत रायमळे हे सदर परिक्षा पहिल्याच प्रयत्नात ऊत्तीर्ण झालेत.[ads id="ads1"]
याबाबत सविस्तर वृत्त असे की, सन २०२३ ची आल ईंडीया बार एक्झामिनेशन (ए.आय.बी.ई.) परिक्षा ०५ फेब्रुवारी २०२३ ला घेण्यात आली होती.नवोदित वकीलांना वकिली व्यवसाय करायचा असल्यास वकिलीची सनद मिळाल्यापासून दोन वर्षांच्या आत सदर परिक्षा ऊत्तीर्ण करणे अनिवार्य असते. अन्यथा वकीली व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून नोंदणी प्रमाणपत्रासाठी पून्हा अर्ज सादर करावा लागतो.[ads id="ads2"]
तरी तामसवाडी ता. रावेर येथील एडव्होकेट राजेश वसंत रायमळे यांनी सदर परिक्षा पहिल्याच प्रयत्नात ऊत्तीर्ण केलेली असून आता ते संपूर्ण देशात कोठेही वकिली व्यवसाय करण्यास पात्र आहेत.
हेही वाचा :- प्रसिद्ध अभिनेत्रीला मुंबईत अटक; हायप्रोफाइल सेक्स रॅकेटचा पोलिसांनी केला पर्दाफाश
हेही वाचा :- जनधन बँक खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर : जनधन बँक खाते असेल तर मिळणार "इतके" रुपये


