ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल
रावेर तालुक्यातील ऐनपुर येथील भगवती मंदिर परिसरात असलेल्या ग्रामपंचायत ऐनपुर यांच्या मालकीच्या बरड्यांचे काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे.
सविस्तर वृत्त असे की ऐनपुर येथील ग्रामपंचायत मालकीच्या असलेल्या सुलवाडी रस्त्यावरील भगवती मंदिर परिसरात असलेल्या बरड्यांचे जेसीबी मशीन च्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन केले जाते आहे हे उत्खनन करून रस्त्यावर व लोकांच्या खाजगी घरांच्या भराव करण्यासाठी वाहतूक करुन टाकला जातो आहे.[ads id="ads1"]
बऱ्याच दिवसांपासून सुरू असलेल्या या उत्खनन व वाहतूकीवर ऐनपुर येथील महसूल विभागाचे तलाठी व ऐनपुर मंडळाचे मंडळ अधिकारी यांनी पुर्णपणे दुर्लक्ष केले आहे ऐनपुर येथील बसस्थानक परिसरातील सरदार वल्लभभाई पटेल चौक या ठिकाणावरून ट्रॅक्टर व डंपर भरुन जातांना दिसत आहेत हे ठिकाण भरपूर वर्दळीचे असून या गौणखणीज वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरांकडे व डंपरांकडे सर्वांचे लक्ष असते परंतु ग्रामस्थांकडून एकच सुर निघतो की याकडे प्रशासनाचे लक्ष नाही का ? मंडळ अधिकारी व तलाठी यांना ही अवैध वाहतूक होतांना दिसत नाही का? ग्रामस्थांनी आपला प्रतिनिधी म्हणून ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांना ग्रामपंचायत कार्यालयात पाठवले आहे ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांचे याकडे लक्ष नाही का?यांचे अवैध गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ठेकेदारासोबत आर्थिक देवाण-घेवाण तर नाही ना? तलाठी व मंडळ अधिकारी यांना आजपर्यंत हे गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर व डंपर दिसले नाही का? [ads id="ads2"]
की यांचे सर्वांचे या या गौण खनिज वाहतूक करणाऱ्या सोबत काही साटेलोटे तर नाही ना? महसूल विभाग यांच्याकडे वाहतूक करीत असलेल्या मुरूम, गिट्टी,माती यांची राॅयल्टी भरली आहे किंवा नाही? ग्रामपंचायत सरपंच,सदस्य,व कर्मचारी हे काही आर्थिक संबंध तर जोपासत नाही ना ? असा सुर ऐनपुर येथील ग्रामस्थांमधून निघत आहे महसूल अधिकारी यांचेवर कोणाचा दबाव तर नाही ऐनपुर मंडळ अधिकारी व तलाठी यांना फोन करून माहिती दिली असता हे उडवाउडवीची उत्तरे देऊन आपली जबाबदारी झटकत असतात प्रशासनाने यांची चौकशी करावी व गौण खनिज वाहतूक बंद करावी अशी मागणी नागरिकांमधून होत आहे