हतनूर धरणातुन 1 लाख 30 हजार पाण्याचा विसर्गतापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन..

अनामित
नंदुरबार : हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस झाल्याने सकाळी 6 वाजता हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात आले आहेत. तापी नदीपात्रात 1 लाख 30 हजार 665 क्युसेक विसर्ग सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आज सकाळी 7 वाजता सारंगखेडा प्रकल्पातील तीन दरवाजे पुर्ण क्षमतेने उघडुन 58 हजार 794 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पातील तीन दरवाजे पुर्ण उघडुन 49 हजार 984 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. 

 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन  नंदुरबार जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!