खावटी योजनेचा लाभ मिळण्यासाठी आदीवासी संघर्ष समीतीचे यावल प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन

अनामित
यावल वार्ताहर (सुरेश पाटील) आदीवासी टोकरे कोळी समाजाला महाराष्ट्र शासनाच्या खावटी कर्ज योजनेच्या लाभा पासुन का? वंचित ठेवण्यात आले यांचा जाब विचारण्यासाठी यावल येथील आदीवासी विकास प्रकल्प कार्यलयावर धरणे आदोलन करुन विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
[ads id='ads1]      
यावल येथील जिनिंग प्रेसच्या सभागृहात टोकरे कोळी जमातीची बैठक अँड गणेश सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आली व जिनिंग प्रेस सभागृहापासून प्रकल्प कार्यलया पर्यंत विविध मागण्याचे घोषणा देत प्रकल्प अधिकारी कार्यलयात धरणे आदोलन करीत विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास प्रकल्प कार्यलयामार्फत खावटी कर्ज योजनेच्या लाभ देण्यात आला असुन आदीवासी टोकरे कोळी समाजातील लाभार्थाची प्रकरणे नाशिक येथील आयुक्त कार्यलयातील आलेल्या मार्गदर्शन सुचना नुसार प्रबलित ठेवण्यात आले असून त्वरीत त्या वंचित ठेवण्यात आलेल्या लाभार्थाना खावटी योजना अंतर्गत दोन हजार रुपये व किराणा कीट वाटप करावे, शासनाने लावलेले विविध अटी शर्टी न लावता नव्याने वंचित लाभार्थाची नावे सामाविष्ट करुन सर्वांना लाभ मिळावा यासह विविध मागण्याचे निवेदन यावेळी देण्यात आले.
      
यावेळी यावल तालुक्याचे युवा नेता संदिपभैया सोनवणे, राहुल तायडे सरपंच बामणोद, प्रमोद कोळी यावल, गोकुळ कोळी मनवेल, खेमंचद कोळी सरपंच पाडळसा, समाधान मोरे, अरविंद सावळे, योगेश बाविस्कर, मोहन कोळी सरपंच पींप्री, समाधान सोनवणे थोरगव्हाण,संदिप सोनवणे रीधुरी, भरत कोळी यावल, कैलास सोळंखे शिरागड, अनिल कोळी साकळी, योगेश कोळी अट्रावल, गजानन कोळी पीप्री सह तालुक्यातील समाज बाधव उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!