मुंबई : येथे जमावबंदी आदेश लागू झाला आहे. मुंबई पोलिसांनी पुढील ९ दिवस कलम १४४ लागू केलं आहे. त्यामुळे आता मुंबईत पुढील ९ दिवस सार्वजनिक ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्रित जण्यास परवानगी नाही. मुंबई पोलिसांकडून आदेश जारी करण्यात आले आहेत.
[ads id='ads1]
त्यामुळे आता गणेशोत्सवात कोणत्याही मिरवणुकांना परवानगी नाही.राज्य सरकारने जाहीर केल्याप्रमाणे प्रत्यक्ष मुखदर्शनास प्रतिबंध असल्याने नागरिकांनी दर्शनासाठी गर्दी करू नये अन्यथा कारवाई करण्यात येईल असा थेट इशारा पोलिसांनी दिला आहे. भाविकांना आता ऑनलाईनच दर्शन घ्यावे लागणार आहे.