सावधान ! हतनूर आणि वाघूर धरणातुन 1 लाख 49 हजार 110 क्युसेक तर सुलवाडे बॅरेजचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने सुरु ; तापी नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन...

अनामित

नंदुरबार - उत्तर मध्य महाराष्ट्रात 30 सप्टेंबर 2021 पर्यंत मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली असल्याने आज हतनूर आणि वाघूर धरणातुन 1 लाख 49 हजार 110 क्युसेक व सुलवाडे बॅरेजचे 12 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडण्यात येवून 2 लाख 32 हजार 701 क्युसेक इतका विसर्ग तापी नदीपात्रात सोडण्यात आल्याने नदीकाठच्या गावातील नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
[ads id='ads1]

पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी सारंगखेडा प्रकल्पाचे 12 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 21 हजार 664 क्युसेक्स व प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पाचे 17 दरवाजे पूर्णपणे उघडून 2 लाख 36 हजार 093 क्युसेक्स इतका विसर्ग तापी नदीपात्रात विसर्ग सोडण्यात आलेला आहे. पुढील 48 ते 72 तासात सदर प्रकल्पाची पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी आवश्यकतेनुसार विसर्ग वाढविण्यात येईल.


 तापी काठावरच्या गावातील नागरिकांनी तापी नदीपात्रामध्ये आपली गुरेढोरे सोडू नये अथवा नदी पात्रामध्ये जाऊ नये. नदीमधील पाण्याचे पंप सुरक्षित स्थळी हलवावे, असे निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सुधीर खांदे यांनी कळविले आहे.


#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!