रावेर प्रतिनिधी ( राजेंद्र अटकाळे ) रावेर येथे आज दिनांक 13 सप्टेंबर सोमवार रोजी सकाळी 11.30 ते दुपारी 1 वाजेदरम्यान रावेर शहरातील संवेदनशील भागातून पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या नेतृत्वात पथसंचालन करण्यात आले.
[ads id='ads1]
प्रथमतः शहरातील महत्वाच्या संवेदनशील भागात, मिश्र वस्ती व जास्तीत जास्त गणपती स्थापना झालेल्या भागाबाबत रूट मार्च चे महत्त्व समजाऊन सांगून सदरचा रूट मार्च हा पोलीस स्टेशन रावेर येथून सुरू झाला.
शहरातील संवेदनशील भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बऱ्हाणपूर जिलेबी सेंटर, पंचशील चौक, संभाजीनगर पूल, बंडू चौक, रमेश मराठे यांचे घर, बंडु चौक, संभाजीनगर पुल, कोतवाल वाडा मशिद, थळा भाग, जतेषा बाबा दर्गा, नागझरी मशिद, म.फुले चौक, स्वामी विवेकानंद चौक, रामास्वामी मठ, पाराचा गणपती, मन्यार वाडा, मशिद, शिवाजी चौक, मंगरुळ दरवाजा, कारागिर नगर, मुस्कान पान सेंटर, भोईवाडा मशीद, गांधी चौक, डॉ. हेडगेवार चौक चोराहा, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक व परत पोलीस स्टेशन असा रूट मार्च काढण्यात आला.
सदर रूट मार्च मध्ये रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्यासह सहा. पो. नि. शितलकुमार नाईक, 3 पोलीस उप निरीक्षक, 16पोलीस, शिघ्र कृती दलात डेपोटी कमांडंट शशिकांत राय, 8 पोलीस अधिकारी 81 पोलीस कर्मचारी, दंग नियंत्रण पथकाचे 19 पोलीस, राज्य राखीव पोलीस दलचे 24 पोलीस, मुंबई महाराष्ट्र सुरक्षा पथकाचे 6 पोलीस, मरोळ पी. टी. सी. च्या 5 महिला पोलीस, मलकापूर वाहतूक सुरक्षा पथक व 17 होमगार्ड उपस्थित होते.