जळगाव (राहुल डी गाढे) जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 7 डिसेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (3) जारी करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्ता लोकांचा जमाव करण्यास पोलीस अधिक्षक, जळगाव यांच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा :- वाघोदा खुर्द येथे दलित वस्तीच्या कामामध्ये गैरव्यवहार : समाजकल्याण अधिकारी यांनी दिले चौकशीचे आदेश
हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी, जळगाव राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.