बेकायदेशीर वाळू चोरून नेल्या प्रकरणी पातोंडी सरपंचावर पोलिसात गुन्हा दाखल ; सरपंच पदही धोक्यात येण्याची शक्यता

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

रावेर प्रतिनिधी (सिद्धार्थ ठाकणे) रावेर तालुक्यातील पातोंडी येथील सरपंच मोहन बोरसे यांना विनापरमिट वाळू चोरी चांगलीच महागात पडणार आहे. त्यांच्यावर रावेर पोलिसात वाळू चोरीचा गुन्हा दाखल झाला झाला असून, पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.तर ते ग्रामस्तरीय दक्षता समितीचे अध्यक्ष असल्याने तहसीलदार यांच्यावतीने त्यांच्याविरुद्ध अपात्रतेचा प्रस्ताव पाठवला जाणार असल्याने सरपंच पदही धोक्यात येणार आहे.[ads id="ads1"] 

रावेर तालुक्यातील पातोंडी येथील सरपंच मोहन बोरसे हे पुंनखेडा शिवारातून भोकर नदी पात्रातून ट्रक्टरने वाळू चोरी करत असल्याचे सोमवारी मध्यरात्री रावेर पोलिसांना आढळून आल्याने, त्यांच्यावर रावेर येथील पोलिसात पोलीस नाईक सुरेश मेढे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता.[ads id="ads2"] 

   त्यानंतर त्यांना अटक देखील झाली आहे. ग्राम पातळीवरील ग्राम स्तरीय दक्षता समितीच्या माध्यमातून परिसरातील वाळू चोरी रोखण्याची जबाबदारी सरपंच यांच्यावर असलेल्या पातोंडी येथील सरपंच मोहन बोरसे यांच्यावर असतांना त्यांच्याकडूनच चोरी झाल्याने, तहसीलदार यांच्यावतीने त्यांचे सरपंचपद अपात्र करण्याबाबत प्रस्ताव पाठवला जाणार असल्याने पातोंडी येथील सरपंच मोहन बोरसे यांना वाळू वाहतूक चांगलीच महागात पडणार  असल्याचे बोलले जात आहे. या घटने मुले बेकायदेशीर रित्या वाळू चोरी करणाऱ्यांच्या गोट्यात  खळबळ उडाली आहे.

सरपंच मोहन बोरसे

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!