प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी ३१ मार्च, २०२२ पर्यंत आपले e- KYC प्रमाणीकरण पुर्ण करावे- जळगाव जिल्हाधिकारी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


   जळगाव (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- जळगाव जिल्ह्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) फेब्रुवारी २०१९ पासून राबविण्यात येत आहे. शासनाकडून आलेल्या मार्गदर्शक सुचनांप्रमाणे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना  (PM-KISAN) अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांना पुढील एप्रिल – जुलै २०२२ या कालावधीचा लाभ प्राप्त होण्यापुर्वी e- KYC  प्रमाणीकरणाची प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली असुन सदर e- KYC   प्रमाणीकरण दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर पर्यंत पुर्ण करणे आवश्यक आहे.  [ads id="ads1"] 

  यासाठी पात्र लाभार्थी शेतकरी यांना e- KYC   करण्यासाठी पुढीलप्रमाणे OTP  किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन दिलेले आहेत.  प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (PM-KISAN) https;//pmkisan.gov.in  या वेबसाईटवरील Farmer Corner मधील e- KYC    या टॅब व्दारे किंok  पी.एम. किसान ॲपव्दारे OTP व्दारे लाभार्थीना स्वत: e- KYC    प्रमाणीकरण मोफत करता येईल.[ads id="ads2"] 

  तसेच ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर e- KYC   प्रमाणीकरण बायोमॅट्रिक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र (CSC) केंद्रावर बायोमॅट्रिक पध्दतीने e- KYC  प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी प्रती बायोमॅट्रिक प्रमाणीकरण दर रु. १५/- मात्र निश्चित करण्यात आला आहे.

  तरी जिल्हयातील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना   (PM-KISAN)   अंतर्गत सर्व पात्र लाभार्थ्यांनी दिनांक ३१ मार्च, २०२२ अखेर पर्यंत आपले e- KYC   प्रमाणीकरण पुर्ण करण्यात यावे, असे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!