तापी नदीच्या पुरामुळे ऐनपुर निंबोल रस्ता पाण्याखाली ; शेतकऱ्याची पिके पाण्यात : लाखोचे नुकसान

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


ऐनपुर प्रतिनिधी:- विजय एस अवसरमल

ऐनपुर ता. रावेर : गेल्या दोन दिवसांपासून राज्यात पाऊस सुरू असून मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यात तापी नदीच्या उगम स्थानावर पाऊस चालू असून आज रोजी तापी नदीला पूर आला आहे.[ads id="ads2"] 

  त्या बॅकवॉटर चा फुगोट्याचे पाणी ऐनपुर निंबोल रस्त्यावर आले असून रस्ता संध्याकाळी ७ वाजेपासून रस्त्यावर पाणी असल्यामुळे रहदारी बंद झाली होती शेतकऱ्याची शेती पाण्याखाली गेली होती तसेच भाजीपाला पेरूची मळे पाण्याखाली आली आहे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. [ads id="ads1"] 

तापी नदीच्या फुगोटाचे पाणी ऐनपुर निंबोल रस्त्यावर ४ वाजेपासून पाणी वाढण्यास सुरुवात झाली होती ह्या भागात असलेली शेती संपूर्ण पाण्याखाली आली असून त्यात केळी पेरू भाजीपाला ची शेती पूर्ण पाण्याखाली आली आहे तसेच ऐनपुर निंबोल रस्त्यावर पाणी आल्यामुळे रस्ता बंद झाला होता तसेच येथील गावातील किनारपट्टीवर असलेल्या लोकांचे स्थलांतर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले आहे यावेळी सरपंच अमोल महाजन ग्रामपंचायत सदस्य अनिल जैतकर पृथ्वीराज जैतकर यांनी नदी काठावरील लोकांना स्थलांतरित करून त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली होती

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!