रावेर तालुक्यातील गोर गरिब गरजुंना स्वस्त धांन्य पुरवठा सुरळीत झाला पाहिजे शासनाने स्वस्त धान्यात कपात करुन गोरगरिबांवर अन्याय केलेला आहे म्हणून शासनाने धान्य कपतीचा निर्णय मागे घेऊन धांन्य पुरवठा सुरळीत करावा तसेच अतिक्रमित घरांचे ग्रामपंचायत मध्ये न .नं.८ ला नोंद झाली पाहिजे व बेघर भुमिहिन गरजु लाभार्थी यांना ग्रामपंचायतीने तात्काळ जागा उपलब्ध करून द्यावी या विषयाचे निवेदन निळे निशाण सामाजिक संघटनेच्या तालुका कार्यकारिणीच्या वतिने निवेदन देण्यात आले.[ads id="ads2"]
त्याप्रसंगी संघटनेचे जळगांव जिल्हा नियोजन समिती प्रमुख चंद्रकांत गाढे , महासचिव सदाशिव निकम साहेब , रावेर तालुका अध्यक्ष सुधिर सैंगमिरे , वाहतुक शाखा ता. प्रमुख शरद तायडे , युवक ता. अध्यक्ष विजय भाऊ धनगर , रावेर शहर अध्यक्ष अजयभाऊ छपरिबंद , विजय पाटील , रितिक महाजन व इतर संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते .


.jpg)