1) रावेर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधिल ग्रामसेवकांनी.सन 2016च्या GR नुसार 2016 ते 2018 दरम्यान 3% निधी तसेच 2018ते 2022/23 या कालावधी पर्यंतच्या ग्रामपंचायतच्या स्वउत्पन्न ग्रामपंचायत निधीतून दिव्यांग बांधवांना 5% निधी त्वरीत देण्यात यावा.
2) तसेच दिव्यांग बांधवांना 50% घरपट्टी मधे माफ करण्यात यावे.
3) दिव्यांग बांधवांना बस,रेल्वेच्या 75% सवलती साठी जिल्हा स्तरावर हाल अपेष्टा सहन कराव्या लागतात.म्हणून तालुक्यातील प्रत्येक,ग्रामपंचायती मधे शासनाने स्वतंत्र पोर्टल(वेबसाईट) देण्यात यावे.
4) दिव्यांग बांधव तसेच विधवा महिलांना 2013 च्या GR नुसार अंत्योदय कार्डचा लाभ एक मही-ण्याच्या आत त्वरित देण्यात यावा.[ads id="ads2"]
वरील मागण्या 1 महिन्याचा आत पुर्ण न झाल्यास प्रहार अपंग क्रांती संस्था महाराष्ट्र राज्य तर्फे आंदोलन करण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेने यावेळी दिलाआहे.यावेळी प्रहार संघटनेचे शेतकरी जिल्हा प्रमूख सुरेश चिंधू पाटील.प्रहार दिव्यांग तालुका अध्यक्ष,विनोद कोळी,उपाध्यक्ष जितेंद्र कोळी,शाखा उपाध्यक्ष,सुरेश अवसरमल,प्रहार अल्पसंख्यांक सोशल मिडिया प्रमुख,फिरोज तडवि.शाखा स-दस्य,विश्वनाथ भिल्ल,प्रहार ऑफिस प्रमुख,सुधिर पाटील.तसेच प्रहार संघटनेचे कार्यकर्ते,गजानन कोळी,आनंदा कोळी सुलवाडि,प्रशांत तायडे,निंबोल इत्यादी कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.




