रावेर तालुका प्रतिनिधि -विनोद हरी कोळी
रावेर ते बर्हाणपूरच्या दरम्यान असलेल्या टोल नाक्यावर आमदार चंद्रकांत पाटील आणि प्रहार जनशक्ती पक्षांचे उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख अनिल चौधरी यांनी आज शेतकऱ्यांच्या तक्रारींमुळे धडक देऊन नागरिकांची अडवणूक करणार्या कर्मचार्यांना समज दिली आहे.[ads id="ads1"]
रावेर बुर्हाणपूर टोल नाका संबंधित रावेर तालुक्यातील गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी व ग्रामस्थ कडून विविध तक्रारी प्राप्त होत होत्या. शेतकर्यांकडून बळजबरी टोल वसुली करणे, अरेरावी करणे, ट्रॅफिक समस्या निर्माण करणे तसेच इतर गोष्टीं बाबत येथील कर्मचारी अरेरावी करत होते. शेतकरी आणि नागरिकांनी या संदर्भात तक्रारी केल्यानंतर आज मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील व प्रहारचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी रावेर-बर्हाणपूर टोल नाक्यावर धडक देत व्यवस्थापनाला जाब विचारण्यात आला तसेच कडक इशारा देत पुन्हा असे गैरप्रकार टोल नाक्यावर होणार नाही यांची हमी व्यवस्थापनाकडून घेण्यात आली.[ads id="ads2"]
रावेर तालुक्यातील शेतकरी व स्थानिक नागरिक खूप जास्त त्रस्त होते होता. यांची दखल घेत आमदार पाटील आणि अनिल चौधरी यांनी टोल प्रशासनाला कायद्याची जाणीव करूण दिली. त्यांनी टोल मॅनेजर पांडे यांना कडक शब्दांमध्ये समज दिली.
हेही वाचा:- रावेर तालुक्यातील " या" गावातील अनोळखी व्यक्तीचा खून; रावेर तालुक्यात खळबळ
जिल्हाधिकारी साहेब व रावेर तहसीलदार सोबत चर्चा होत नाही तोपर्यंत टोल चालू करायचं नाही अशी समज दिली.यावेळीं शिवसेना व प्रहार पक्षाचे कार्यकर्त्यांसह शेतकरी व स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.