'पन्नी' दारू विक्री होते हे पोलिसांना समजत नाही का..?
यावल ( सुरेश पाटील) साहेब...! साकळी गावाच्या परिसरात खुलेआम ' पन्नी ' ची दारू सर्रासपणे विकली जात आहे.या पन्नीच्या दारूच्या आहारी मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग गेलेला असून या दारूने गावातील तरुण वर्गाचे आरोग्य धोक्यात आले आहे.या अनधिकृत बनावट पन्नीच्या दारूमुळे गावातील अलीकडच्या काळात काही तरुणांनी आपला जीवही गमावला आहे.या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून साहेब... आमच्या साकळी गावातील 'पन्नी' ची दारू अगोदर बंद करा हो ! अशी सार्वजनिक समाजहिताची मागणी जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र (छोटू) सूर्यभान पाटील यांनी थेट साकळीच्या शांतता समितीच्या बैठकीत केली.व ही दारू लवकरात लवकर बंद करा अशी विनंती केली. [ads id="ads1"]
रवींद्र उर्फ छोटू पाटील यांनी समाज हिताची योग्य अशी मागणी केल्याने साखळी गावासह संपूर्ण परिसरात एकच चर्चेचा विषय होता.
साकळी येथे गाव परंपरेची शिवजयंती,अक्षय तृतीया व रमजान ईद,महात्मा ज्योतिबा फुले जयंती असे सण उत्सव साजरा केले जाणार आहे.हे सर्व सण-उत्सव शांततेत व जातीय सलोख्याने साजरे होण्यासाठी दि. ८ रोजी साकळी येथील ग्रामपंचायत कार्यालयात यावल पोलीस प्रशासनाच्या वतीने शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले होते. [ads id="ads2"]
तथापि ही बैठक ऐन वेळेला आयोजित करण्यात आल्याने बैठकीला उपस्थित राहण्यासाठी ग्रामपंचायत समोरून जाणाऱ्या नागरिकांना पोलीस अक्षरशः बोलवीत होते. व शांतता समितीच्या बैठकीला थांबा. साहेब आलेले आहे असे पोलीस सांगत होते.या बैठकीला यावल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश माणगावकर,जळगाव जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण व आरोग्य सभापती रविंद्र उर्फ छोटू पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती अधिकारी हेमंत जोशी यांचेसह साकळी व शिरसाड येथील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
बैठकीच्या अगदी शेवटी सर्व विषय आटोपल्यानंतर माजी सभापती रविंद्र पाटील यांनी साहेब...! गावाच्या परिसरात पन्नीची दारू सर्रासपणे विक्री केली जात आहे.असे सांगताच पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर साहेब अगदी थक्क झाले व त्यांनी सभेतच क्षणाचा विलंब न करता साकळीबीटचे पोलीस सिकंदर तडवी यांना या दारू विक्रीच्या प्रकाराबाबत विचारत दारू विक्री करणाऱ्यांवर कारवाईसाठी कागदपत्रे तयार करा असा आदेशच माणगावकर साहेब यांनी पोलिसांना दिला.हा सर्व प्रकार उपस्थित ग्रामस्थांसमोर उघड झाल्याने तालुक्यातील अवैध धंद्यांवर पोलीस प्रशासनाचा किती अंकुश आहे ? हे मात्र प्रकर्षाने दिसून आले.आता एका बड्या पदाधिकाऱ्याने पन्नीची दारू बंद करण्यासाठी केलेली मागणी पोलीस प्रशासन किती गांभीर्याने घेते ? आणि पनीची दारू केव्हा बंद होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.एकूणच या बैठकीची गावात चर्चा रंगली होती.
साकळी गावात 'पन्नी' ची दारू विक्री होते हे याची माहिती मात्र स्थानिक पोलिसांना आणि गोपनीय विभागाच्या पोलिसांना का..? समजले नाही,त्यामुळे पोलिसांच्या खबऱ्यासह पोलीस प्रशासनाला हे एक फार मोठे आव्हान आहे.


