शनिवारी (1 जुलै) सकाळी 11 ते 12.30 या वेळेत उद्घाटन सत्र, दुपारी 12.30 ते 1.30 या वेळेत राष्ट्रीय व महाराष्ट्रस्तरीय आव्हाने या विषयावर चर्चासत्र, 2.30 ते 4.30 या वेळेत गटचर्चा होईल. सायंकाळी 5 ते 6.45 या वेळेत समूहचर्चा, तर सायंकाळी 7.00 ते रात्री 8.00 या वेळेत परिसंवाद, रात्री 8.00 ते 8.30 या वेळेत जागर महाराष्ट्राचा यात 2024 च्या तयारीसाठी राज्यभर करण्याच्या कृती कार्यक्रमाचा आराखडा सादर केला जाईल. रात्री 8.30 पासून मंजू भारद्वार लिखित
गोधडी हे नाटक सादर करण्यात येईल. दुसर्या दिवशी रविवारी (2 जुलै) सकाळी 9.30 ते 12.30 या वेळेत आदल्या दिवशी मांडलेल्या आराखड्यावर विभाग व जिल्हानिहाय चर्चा होईल. दुपारी 12.30 ते 2.00 या वेळेत गटचर्चा, तर दुपारी 3 ते सायंकाळी 5.00 या वेळेत संमेलनाचा समारोप होईल. मान्यवरांची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली असून, गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात निवासव्यवस्था करण्यात आली आहे, संमेलन स्थळी निमंत्रक प्रतिभा शिंदे,संमेलनाचे स्वागताध्यक्ष मुकुंद सपकाळे,डॉ.अब्दुल करीम सालार,राम पवार, सचिन धांडे,डॉ.सत्यजित साळवे, हरिश्चंद्र सोनवणे, भरत कर्डिले, विनोद रंधे, जयसिंग वाघ, दिलीप सपकाळे,विनोद सपकाळे,प्रतिभा शिरसाठ,सुरेंद्र पाटील,डॉ.मिलिंद बागुल,जयसिंग वाघ,बापू पानपाटील,सोमनाथ पाटील,अजय पाटील अनेक कार्यकर्ते संमेलन यशस्वीतेसाठी मेहनत घेत आहेत.