यावल ( सुरेश पाटील)
यावल तालुक्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींनी खरीप हंगाम २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही असे आवाहन यावल तहसीलदार सौ.मोहनमाला नाझीरकर यांनी केले आहे.
त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्याचे ई-पीक पाहणी प्रकल्पाचे उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक श्रीरंग तांबे यांच्या आदेशानुसार ई-पीक पाहणी मोबाईल अॅपच्या सहाय्याने सर्व खातेदार शेतकऱ्यानी तलाठ्याकडे न जाता स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या ७ /१२ वर विविध पिकांची नोंदणी करता येणे शक्य झाले आहे.महसूल विभागाचा ई-पीक पाहणी प्रकल्प १५ ऑगस्ट २०२१ पासून महाराष्ट्रात राज्यभर राबविण्यात येत आहे.या अॅपमध्ये आतापर्यंत सुमारे १.८८ कोटीपेक्षा अधिक शेतकऱ्यानी रजिस्ट्रेशन केले आहे व आपल्या पिकांची नोंदणी केली आहे.
खरीप हंगाम २०२३ पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणीचे २.०.११ हे अपडेटेड व्हर्जन गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे.तरी सर्व खातेदार शेतकऱ्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे.खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईल अॅपद्वारे पीक पाहणी करण्यासाठी ०१ जुलै २०२३ पासून सुरु करण्यात येत आहे.
तरी राज्यातील सर्व शेतकरी बंधु-भगिनींना अवाहन करण्यात येते कि त्यांनी खरीप हंगामा २०२३ साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई - पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी जेणे करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यास अडचण येणार नाही. असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात यावल तहसीलदार सौ.मोहन माला नाझीरकर यांनी नमूद केले आहे.आणि यासाठी यावल तालुक्यातील मंडळ अधिकारी,तलाठी आपापल्या कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि सहकार्य करीत आहेत.


