यावल (सुरेश पाटील)
रावेर तालुक्यातील सावदा येथील 200 वर्षे पुरातन काळभैरव,म्हाळसा देवी,खंडेराव मंदिराचा नवरात्रीचा भंडारा शुक्रवारी उत्साहात झाला.यावेळी गोदावरी फाउंडेशनच्या संचालिका डॉ.केतकीताई पाटील व डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते म्हाळसादेवीची आरती करण्यात आली.[ads id="ads1"]
200 वर्षांपूर्वी पासून धनगर वाड्यात कालभैरव, म्हाळसादेवी,खंडेराव मंदीर आहे.2012 मध्ये या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यात आला. 12 वर्षांपासून ठेचा व कळण्याची भाकरीचा नवरात्रीचा भंडारा येथे होत आहे.सकाळी डॉ.केतकीताई पाटील व डॉ.वैभव पाटील यांच्या हस्ते आरती होऊन महाप्रसादाची सुरुवात झाली. [ads id="ads2"]
या भंडारा मध्ये सावदा व आसपासच्या गावातील हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.या वर्षी 6 क्विंटल कळण्याची भाकरी व 4 क्विंटल ठेचाचा महाप्रसाद होता. यासाठी म्हाळसादेवी मित्र मंडळ,माताराणी दुर्गाउत्सव मंडळ व जगमाता मित्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



