धक्कादायक : पैश्यांसाठी जादूटोणा करून महिलेची हत्या !

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

 


जळगाव प्रतिनिधी (समाधान गाढे) जळगाव शहरातील शिवाजी नगरातील ५१ वर्षीय विवाहित महिला दि.१५ पासून बेपत्ता झाली होती. याप्रकरणी जळगाव शहर पोलिसांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने तपास करीत दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची सदर कबुली दिली आहे.
[ads id="ads1"] 

याप्रकरणी दोन जणांना शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशीरा जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते.[ads id="ads2"] 

सविस्तर वृत्त असे की, माया दिलीप फरसे (वय-५१) रा. क्रांती चौक, शिवाजी नगर जळगाव ह्या महिला बुधवार १५ डिसेंबर रोजी सकाळी ९.३० वाजता घरात कुणालाही काहीही न सांगता घरातून बेपत्ता झाल्या होत्या. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली होती. जादूटोणातून हा प्रकार झाल्याचा आरोप मयत महिलेल्या नातेवाईकांनी केला होता. यासंदर्भात नातेवाईकांनी अमोल रतनसिंग दांडगे (वय-२७) आणि संतोष रामकृष्ण मुळीक (वय-२२) रा. शिवाजी नगर, जळगाव या दोन संशय व्यक्त केल्याने सोमवारी जळगाव शहर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे.

जळगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक गभाळे, उपनिरीक्षक अरुण सोनार, कर्मचारी भास्कर ठाकरे, रतन गिते यांनी दोघांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. महिलेचा जादू टोण्याच्या प्रकारातून खून करून तिला तापी पात्राजवळ बुजण्यात आल्याचे सांगितले. 

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!