सुवर्ण दिप वृत्तसेवा (राहुल डी गाढे) Jalgaon जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात ५ फेब्रुवारी, २०२२ पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ चे पोटकलम (१) व (३) जारी करण्यात आले आहे.[ads id="ads2"]
Jalgaon अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी याबाबत कळविले आहे. Maharashtra शासनाच्या आदेशानुसार मनाई आदेश लागू केलेल्या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे.
हेही वाचा :- Jalgaon : जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन.एस.चव्हाण यांची बदली तर डॉ. किरण पाटील यांची नियुक्ती |
हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे Jalgaon अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

