कर्जबाजारीपणा मुळे ६ महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या भादली च्या तरुणाची आत्महत्या

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


भादली ता. जळगाव (गोविंदा चिनावले)  : सहा महिन्यांपूर्वीच लग्न झालेल्या भरत भिकन पाटील (वय (२३) या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी भादली (ता. जळगाव) येथे घडली. भरत याने कर्ज काढून नवीनच चारचाकी घेतली होती. त्याशिवाय विविध सहकारी सोसायटीचेही त्याच्यावर कर्ज होते. त्यामुळे तो नैराश्यात होता व त्यातूनच हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.[ads id="ads1"]  

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भरत हा वडील भिकन दगा पाटील, आई वंदना, पत्नी व लहान भावासह वास्तव्याला होता. काही दिवसांपूर्वी त्याने कर्ज काढून चारचाकी घेतली होती. त्यावर त्यांचा उदरनिर्वाह चालत होता. आई, वडील शेतीचे काम बघत होते स्वतःच्या मालकीची थोडीच शेती आहे. [ads id="ads2"]  

चारचाकीवर पुणे, नागपूर, मुंबई व गुजरात अशा लांब ठिकाणी दोघे भाऊ जात असत. लहान भाऊ गाडी घेऊन मुंबईला गेला होता, तर भरत घरीच होता.सोमवारी रात्री कुटुंबासोबत त्याने जेवण केले. पुढच्या खोलीत आई वडील, तर मागच्या खोलीत पती-पत्नी झोपले होते. पहाटे चार वाजता पत्नी झोपेतून उठली असता, पतीने गळफास घेतल्याचे दिसले. हा प्रकार पाहून तिने एकच हंबरडा फोडला. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

याप्रकरणी तालुका पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद केल्याची माहिती पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दिली

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!