रावेर तालुका प्रतिनिधी - विनोद हरी कोळी
ऐनपुर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाने चालवलेले सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपूर येथे गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव मार्फत गांधी विचार संस्कार परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. ६४ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता प्राचार्य डॉ. जे. बी. अंजने यानी परीक्षेचे महत्व पटवून दिले तसेच गांधी विचारांची आजच्या स्थितीत विद्यार्थ्यांना व देशाचे प्रत्येक तरुण व तरुणीला अत्यंत आवश्यकता आहे. असे मत मांडले.परीक्षेचे संपूर्ण आयोजन या मंडळाचे समन्वयक प्रा डॉ. पी आर गवळी यांनी केले.[ads id="ads1"]
प्रा. प्रदीप तायडे व प्रा विलास पाटील यांनी परीक्षेचे काम पाहिले. गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे नुकताच जिल्हास्तरीय निकाल जाहीर करण्यात आला आहे. या निकालामध्ये ऐनपुर महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साक्षी डिगंबर लवंगे हिने जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला त्याबद्दल तिला गांधी रिसर्च फाउंडेशन तर्फे सुवर्णपदक व स्मृतिचिन्ह देण्यात आले. [ads id="ads2"]
या यशाबद्दल ऐनपूर परिसर शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन श्री श्रीराम पाटील व सेक्रेटरी श्री. संजय वामन पाटील व सर्व संचालक मंडळाने अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जे बी अंजने, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.