बंगलुरू / कर्नाटक पासून शुभारंभ
नगर येथील अशोक सब्बन यांचा सक्रिय सहभाग
यावल (सुरेश पाटील)
राष्ट्रीय किसान समन्वय समितीची दक्षिण भारतातील शेतकऱ्यांच्या संघटनाच्या प्रतिनिधीची तीन दिवसाची कार्यशाळा नुकतीच कर्नाटक राज्याची राजधानी असलेल्या बंगलुरू येथिल म.गांधी भवन येथे नुकतीच संपन्न झाली. [ads id="ads1"]
या कार्यशाळेसाठी 27 संघटनांचे सुमारे 120 प्रतिनिधीनी उपस्थिती दर्शवून परिसंवाद,चर्चा सत्र,प्रश्न उत्तरे,या मार्फत विचाराचे व भूमिकांचे आदान प्रदान केले.या परिषदेत समारोपात देशभरातील शेतकऱ्यांच्या सर्व समस्याची सोडवणूक करण्यासाठी म.गांधीनी दाखवलेल्या मार्गाचा अवलंब करून *" ग्राम स्वराज"* या कल्पना स्विकारून विकासात्मक व शासनाकडे प्रलंबित असलेल्या काही विषयावर संघर्षात्मक भूमिका घेण्याचे निश्चित करण्यात आले. प्रचार,प्रसार व संघटनात्मक बाबीची पूर्तता करून देशपातळीवर एकाच वेळी सर्व जिल्ह्यात जनआंदोलन उभारण्याचा प्रयत्न करण्याची तयारी सुरू करावे असाही ठराव करण्यात आला.[ads id="ads2"]
सदर कार्यक्रमचे संयोजन दयानंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील नव कर्नाटक रयत संघाने पार पाडली. या परिषदेमध्ये किसान समन्वय समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी दशरथ कुमार,यांची पुढील वर्षासाठी फेर निवड करण्यात आली.
या कार्यशाळेत महाराष्ट्र राज्यातील नगर येथील राष्ट्रीय लोक आंदोलनाचे सरचिटणीस अशोक सब्बन यांनी पंचायतराज या विषयावर तीन ही दिवस सविस्तर मार्गदर्शन करून विविध ठराव मांडण्यात पुढाकार घेतला व लवकरच कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे असे सांगितले.तीन दिवशीय कार्यशाळेत वाराणसी येथिल जेष्ठ म.गांधी विचार प्रचारक अमरनाथ भाई,तामिळनाडूचे सुंदरम,जे चिन्नाप्पा,कर्नाटकचे दयानंद पाटील,आर.वाय.उमादेवी, सुरीथ्राआंमा,कलबुर्गी जिल्हा परिषदचेचे उपाध्यक्ष मंहता हिरेमठ,केरळचे प्रा.ई.पी.मेनन,
आंध्रप्रदेशचे शिवाजीनागाप्पा,दलजीत कौर,यासह अनेक कार्यकत्यानी सहभाग नोंदवला.


.jpg)