भुसावळ (सुवर्ण दिप वृत्तसेवा) :- दि.19/05/23 रोजी भुसावळ तालुक्यातील निंभोरा ब्रु (दीपनगर) येथे त्रिरत्न बुद्ध विहारात एक आदर्श विवाह सोहळा संपन्न झाला.[ads id="ads1"]
सदरचा विवाह चंदन निकम व भारतीय बौद्ध महासभा चे केंद्रीय शिक्षक प्रकाश सरदार याच्या पुढाकारने जळगाव ची वधू सुरेखा विलास सुरळके व रावेर तालुक्यातील नेहेता येथील वर शुभम दिलीप साळवे यांच्या मध्ये निंभोरा येथील त्रिरत्न बुद्ध विहारात बोद्धचार्य एस. पी. जोहरे यांच्या हस्ते पार पडला.[ads id="ads2"]
यावेळी अरुण भालेराव, राहुल वाघ,मनोहर दांडेकर, कैलास सुरळके,रोशन सुरळके, तरुण गवई, प्रणव मेश्राम,निखिल मेश्राम, विशाल मेश्राम इत्यादी मोजक्या पाहुण्या समक्ष चहा पाण्यावर याच्या प्रमुख उपस्थित विवाह संपन्न झाला.
हेही वाचा: उद्योजक बनायचं आहे का ? मग आजच अर्ज करा.....महाराष्ट्र शासनातर्फे मिळणार व्यवसायासाठी तब्बल "इतके" रुपये
हेही वाचा: दहावी पास उमेदवारांसाठी सुवर्णसंधी : भारतीय डाक विभागात 12828 जागांसाठी भरती
हेही वाचा: पेपर मिलला भीषण आग ; कोट्यवधी रुपयांचे नुकसान : जळगाव जिल्ह्यातील घटना
या वेळी प्रकाश सरदार यांनी वर-वधूला आशीर्वाद देत "अशी विवाह होणे ही काळाची गरज आहे. वधू व वर दोन्ही पाहुणे मंडळी चे कौतुक केले."


