सावदा येथील घनकचरा प्रकल्पाची"जिल्हाधिकारी" पाहणी करतील का?

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे

सावदा येथील घनकचरा प्रकल्पाची"जिल्हाधिकारी" पाहणी करतील का?

सावदा प्रतिनिधी (युसूफ शाह)

सावदा :- ज्या प्रमाणे जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नुकतेच भडगाव नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाची पाहणी करून कौतुक केले.त्याच धर्तीवर त्यांनी रावेर तालुक्यात असलेल्या सावदा येथे कोटी रुपये खर्चून नगरपालिका मार्फत उभारलेल्या घनकचरा प्रकल्पावर सुरु असलेल्या भोंगळ कारभाराची स्वतः येऊन पाहणी करावी,अशी अपेक्षा शहरातील सुज्ञ नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सावदा नगरपालिका घनकचरा प्रकल्पावरती संपूर्ण शहरातील ओला,सुका सह विविध प्रकारच्या कचऱ्यांवर नियमित प्रक्रिया ठप्प असल्याने प्रकल्प परिसरात कचऱ्यांचे शिखर उभे असून नवीन कचरा टाकण्यासाठी सदर ठिकाणी जागा शिल्लक दिसून येत नाही. तसेच वेळेवर शहरात साफसफाई सर कचऱ्यांची उचल केली जात नाही.या अनुषंगाने प्राप्त तक्रारीवरून या प्रकल्पावर मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी काही महिन्यांपूर्वी भेट दिली असता सदर ठिकाणी त्यांना कामात निष्क्रियता आढळून आली होती.[ads id="ads2"]

  तसेच शहरातील बऱ्याच भागात घंटागाडी जात नाही, घर ते घर ओला,सुका कचरा संकलन करताना वेगळा वेगळा घेतला जात नाही, वेळेवर कचऱ्याची उचल होत नसून वारंवार पालिकेत नागरिकांकडून तक्रारी प्राप्त होत असते, वाहनांचा रूट मॅप अभावी कोणत्या वेळेत घंटागाड्या व ट्रॅक्टर कचरा संकलनासाठी जाते याचा नागरिकांना बोध होत नाही, प्रकल्प वरती प्रक्रिया ठप्प असल्याने येथे मोठ्याप्रमाणावर कचरा तसेच पडून आहे.यामुळे (जीएफसी फील्ड मूल्यांकन)ला अडथळा होऊन पालिकेचा (रँकिंग)कमी झाल्यास ठेका घेणारी संस्था जबाबदार धरली जाईल,या प्रकल्पावरती ओला, सुका कचऱ्यांचे विलगीकरण शून्य प्रमाणात दिसून येते,अशा गंभीर मुद्दे नमूद असलेली नोटीस  घनकचरा संकलन,प्रक्रिया वगैरे बाबींची कामे घेणाऱ्या(एस.आर.ग्रीनवे नाशिक)या संस्थेच्या ठेकेदारास मुख्याधिकारी यांनी बजावली होती.तरी सुद्धा आजतागायत ठेकेदाराच्या कामात कोणतीस सुधारणा अजीबात दिसून येत नाही.उलट या घनकचरा प्रकल्पावरती परिस्थिती जैसे-थे असून,कोणत्या निकषांच्या आधारावर दर महिन्याला पालिका प्रशासनाकडून लाखोंची बिले कामात अनियमितता आढळूनही एस.आर.ग्रीनवे नाशिकच्या ठेकेदारास अदा केले जाते.हे प्रश्न शहरातील सर्व करदात्यांना भेडसावत आहे.तरी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून राबवली जात असलेली स्वछता हीच सेवा अभियानांतर्गत तात्काळ या घनकचरा प्रकल्पावर येवून पाहणी केल्यास संबंधितांवर  कठोर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला शिवाय राहणार नाही.हे मात्र खरे आहे.

#buttons=(Ok, Go it!) #days=(5)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!