शेती साठी अधिकचा विद्युत पुरवठा सुरळीत मिळवा शिवसेना रावेर तालुका प्रमुख वाय.व्ही. पाटील यांची मागणी

सुवर्ण दिप न्यूज : मुख्य संपादक : राहुल डी गाढे


 रावेर  ( सुवर्ण दिप वृत्तसेवा) : सद्या मे महिन्यामध्ये तापमान वाढण्याची खूप शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या नवीन केळी व इतर पीक लागवडीमध्ये पुरेशा प्रमाणामध्ये पाण्याचे नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु महावितरण कडून जो विद्युत पुरवठा मिळत आहे तो कमी प्रमाणात आहे व अनियमीत आहे. [ads id="ads1"]  

 त्यामुळे शेतीपिकाचे नुकसान होवू शकते. शेतकरी हिताच्या दृष्टिने आपण सकारात्मक विचार करुन विद्युत पुरवठा हा नियमित व १२ तासाचा करावा अश्या स्वरूपाचे निवेदन शिवसेना शिंदे गट यांच्यामार्फत देण्यात आले.यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी सोबत शिवसेना पदाधिकारी व शेतकरी वर्ग पीतांबर पाटील,भगवान पाटील,प्रवीण पंडित,कुणाल बागरे,मुकेश चौधरी,राजू लोहार,नितिन महाजन, आदी जन उपस्थित होते.

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!