रावेर प्रतिनिधी (राजेंद्र अटकाळे)
ऐनपूर येथील सरदार वल्लभभाई पटेल कला व विज्ञान महाविद्यालय ऐनपुर येथे महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीच्या निमित्ताने प्रा.डॉ.जी.आर. ढेंबरे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.[ads id="ads1"]
या कार्यक्रमाच्याप्रसंगी बोलताना ते म्हणाले की, तरुणांनी महात्मा गांधींचे विचार स्वीकारावे. आयुष्यामध्ये गांधी विचारांचा स्वीकार करून जीवन जगावे. आभासी वास्तवापेक्षा सत्यातील जीवन तरुणांनी समजून घ्यावे. गांधीजींचे मूल्य शाश्वत आहेत. गांधी विचार जगाने मनापासून स्वीकारले पंरतु दुर्दैवाने भारतात मात्र गांधी विचारांबद्दल चुकीच्या धारणा आहेत. गांधीजींच्या सत्याचे प्रयोग हे पुस्तक भारतातील प्रत्येक तरुणाने वाचले पाहिजे. [ads id="ads2"]
या व्याख्यान प्रसंगी प्रा.डॉ. ढेंबरे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या जीवन कार्याचा मुलांना परिचय करून दिला. या कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.एस. बी.पाटील हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. डी. बी.पाटील यांनी केले. हा कार्यक्रम घेण्यामागचे उद्दिष्ट त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून मांडले.
हेही वाचा :- गट नंबर टाकून 1880 सालापासूनचे जमिनीचे नकाशे, सातबारा उतारा, फेरफार नोंदी पहा थेट आपल्या मोबाईल वर
हेही वाचा :- Pm Kisan Scheme च्या हप्त्याचे 2000 हजार रुपये कोणा - कोणाला मिळतील यादीत नाव आहे की नाही ? येथे क्लिक करून यादी पहा
हेही वाचा : - Majhi Kanya Bhagyashree Scheme : एक मुलगी असेल तर मिळणार ५० हजार रुपये असा करा अर्ज
हेही वाचा :- रावेर पंचायत समितीतील शौचालय गैरव्यवहार प्रकरणी गटविकास अधिकाऱ्यांची चौकशी
हेही वाचा : महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी मदत जाहीर ! हे जिल्हे झाले पात्र : पहा तुमचा जिल्हा आहे की नाही (संपूर्ण यादी व शासन निर्णय पाहा)
सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक अल्ताफ पटेल यांनी केले. आभार प्रदर्शन प्राध्यापिका डॉ. रेखा पाटील यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.