वडोदा परीसरातील शेतशिवारातील घटना : पशूपालकांमध्ये पसरली घबराट
शेतातील कळपावर चढवला हल्ला
शालिग्राम निनाजी बोदडे (वडोदा) यांनी आपल्या वडोदा येथील गट क्रमांक 268 शेतामध्ये बकऱ्यांचा कळप लावल्यानंतर ते जेवण करण्यासाठी त्यांच्या घरी वडोदा (Vadhoda) येथे गेले असता अचानक लांडग्याने हल्ला चढवल्याने 14 बकऱ्यांसह बोकडांचा मृत्यू ओढवला तर काही बकऱ्या जखमी झाल्या. [ads id="ads2"]
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शेतकऱ्याने गावातील काही ग्रामस्थांसह व शिवसेना उप तालुकाप्रमुख नवनीत पाटील यांना फोनवर माहिती दिली असता नवनीत पाटील यांनी तत्काळ वनविभागाच्या (Forest Department) कुऱ्हा वनपाल बी.आर. मराठे व वनपाल पाचपांडे यांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी धाव घेतली व त्यांनी नुकसानीची माहिती जाणून घेत पंचनामा केला.
हेही वाचा :- Jalgaon : जिल्ह्यातील 'या' आमदारांची आमदारकी धोक्यात ?
हेही वाचा :- Bhusawal : पोलीस उपनिरीक्षकाला मारहाणप्रकरणी फरार आरोपीला केली अटक
हेही वाचा :- रावेर पंचायत समिती येथे निळे निशाण सामाजिक संघटनेच्या वतीने निदर्शने
हेही वाचा :- यावल तालुक्यातील भालोद येथील ४५ वर्षीय इसमाची आत्महत्या
शालिग्राम निना बोदडे (Shaligram Ninaji Bodade) यांच्या शेताला तार कंपाउंड असलेतरी लांडग्याने हल्ला चढवत बकऱ्यांचा फडशा पाडला. आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी सोमवारी रात्रीच भ्रमणध्वनीवरून संपूर्ण माहिती जाणून घेत वनविभागाला पंचनामा करून भरपाई देण्याबाबत सूचना दिल्या.

